0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव- ठाणे |
गेल्या पाच वर्षात सरकार मंत्री लोकप्रतिनिधी नोकर्‍यांच्या पाठीमागे धावण्यापेक्षा छोटे छोटे उद्दयोगधंदे करा त्यांच्या पाठीला पाठ लावुन काँगे्रस राष्ट्रवादी शिवसेना अन्य लोकही उद्दयोगात पडा तरूणानों,नोकरीच्या मागे धावू नका असे मार्गदर्शन करत होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव कोरोनात आला आहे.उद्दयोगात पडण्याच्या मार्गदर्शनाने लाखो तरूणांनी छोटे छोटे धंदे व्यवसाय सुरू केले.वडापाव पासून रिक्षा,टेम्पो,बस,कालीपीली जिप,टॅक्सी,टमटम,मोबार्इल दुकाने,केस कर्तनालय खानावळ,हॉटेल व्यवसाय,ढाबे,हार्डवेअर,कपडा दुकान अशा छोटया छोटया व्यवसायाकडे बँक,खाजगी सावकार,सोसायटया मधून कर्ज घेऊन वळले मात्र याच उद्दयोग व्यवसायिकांना केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारनी बेरोजगार बनवले आता त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्यांनी बेरोजगार पोर्टल आणले आहे.नोकर्‍या आणल्या आहेत.तत्णांना स्वातंत्र व्यवसायातून नोकरभरतीच्या दलदलीत आणल्याने बेरोजगारावर मोठे संकट उभे राहिले आहे.
         उद्दयोग व्यवसायाने कौटूंबिक स्थिती मजबूत होत असताना दोन्ही सरकारने कोरोना कालावधीत छोटया उद्दयोग व्यवसायिकांना गरिबीत लोटले आहे.रिक्षा,टॅक्सी,भाडेकरू,छोटे व्यवसायिक,प्रचंड कर्जबाजारी झाले आहेत.ज्यांच्यासाठी कोरोना कोरोना जबाबदारी खबरदारीचा खेळ सरकार खेळला त्याच गोर गरिबांवर आत्महत्याची पाळी आली आहे.कोरोनाची लागण झाली तर लाखो रूपये दवाखाण्यात कोठून आणायचे,सरकारी रूग्णालयात बेड शिल्लक नसतात,उपचार होत नाहीत,नुसते कोंबुन ठेवतात  तर  खाजगी दवाखाण्यात लाखो रूपयांचा बिल दिला जातो.लाख रूपये डिपॉझिट घेतल्या शिवाय रूग्णांना अ‍ॅडमेट करून गेत नाहीत तर दुसरीकडे चार महिने घरात कोंबून ठेवल्याने घरात खाण्यास अन्न नाही अशा परिस्थितीत अनेक जणांचा आजार दडवून मृत्यु होतो मग लॉकडाऊन काय फायद्दयाचा ? जेव्हा लॉकडाऊन केला तेव्हा रूग्ण नव्हते आज रूग्ण  वाढले,लॉकडाऊन शीतल झाला मात्र,उपचार मिल्त नाहीत.कोरोनाच्या नावाने रेशनिंग,आरोग्य कोव्हीड सेंटरची दुरूस्ती उभारणी साहित्य यावर प्रचंड कोटी रूपये खर्च केला मात्र,घरात कोंबून ठेवलेला सामान्य माणूस बेरोजगार उपाशीपोटी झोपत आहे.त्याला आरोग्य फुकट नाही,शिवाय वीजबील,पाणीपट्टी,घरपट्टी सर्व कर सुट देऊन भरण्यास सांगितले जात आहे.बँक,सोसायटया,खाजगी सावकार यांनी आणले.कर्जाचे हप्ते वसुल केले,शेतीसाठी काही मदत नाही,कर्जाच्या ओझ्याखाली प्रत्येक माणूस घरात कोंबून राहिला आहे.
        सरकारची हुकूमशाही चालली आहे.नगरपंचायतपासून महानगरपालिका,ग्रामपंचायत मनमानी आदेश काढतात,घरात कोंबून ठेवतात,किराणा दुकानदारांपासून रात्रीचे दवाखाने सुध्दा बंदे करतात,खाजगी रूग्णालयात रूग्णांना घेऊ नका,सरकारी मध्ये पाठवा असा फतवा काढला जातो.रूग्ण तपासणी फीस लोकांना परवडत नाही मात्र,सरकार काहीच देण्यास तयार नाही उलट सरकारच्या म्हणण्याप्रमाणे वागा नाहीतर गुन्हे दाखल करू असा दम देतात यावर आता लोकशाहीत नियंत्रण आणि दबाव टाकणारा कोणताही पक्ष नेता राहिला नाही.
         राजकारण्यांना कोरोना होतो त्यांच्यावर अलिशान रूग्णालयात उपचार होतात मग गरिबांना का बेड मिळत नाही त्यांना सरकारी सेवा कशासाठी कोरोना ? हा भष्टाचाराचा कुराण आहे असा आरोप भाजप पक्षाचे नेते करत आहेत.तिकडे काँग्रेसच्या आमदारांनी लॉकडाऊन केंद्र सरकारने आणला,जानेवारीत येणे गरजेचे होते,राजकारण करतात असे ऐकामेकांवर आरोप करून आपल्या निवडणूका पार पाडुन घेत आहेत.ठाणे जिल्हा परिषदेने अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेतली.मुरबाड,अंबरनाथ अन्य पंचायत समितीच्या निवडणूका कडक लॉकडाऊन मध्ये घेतल्या मात्र,गरिबांना रस्त्यावर बाहेर येवू नका असे सांगणारे राजकारणीजनतेच्या मनातून उतरून गेले आहेत.
        लॉकडाऊन करून कोरोना अधिक वाढला.जेवढा खुल्या बाजारात वाढला नव्हता म्हणजे खरा कोरोना कोणता त्यावर निदान झाले नाही.मात्र,कोरोना कालावधीत प्रचंड महागार्इ वाढली,भुकबळी वाढत चालविला,रूग्ण वाढत चालले त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणेत प्रचंड भ्रष्टाचार  सुरू आहे.गरिबांच धान्य  हजारो टन काळयाबाजारात विकलं,तहसिलदार,नगरपंचायत,रूग्णालय कोव्हीड सेंटरला आलेला निधी यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे.मात्र,त्याची चौकशी करून कारवार्इ करण्यापेक्षा लोकांना बंधिस्त  केले.मोर्चे,आंदोलने होऊ नये माहिती मागू नये म्हणुन कार्यालय बंद केले फक्त कोरोना…कोरोना…
मात्र,कोरोनावर मात करण्यास सरकार दोन्ही अपयशी  ठरले आहेत.सरकारने शिक्षणाचा घो घातला,शालेय विद्दयार्थी ऑनलार्इनसाठी मोबार्इल लॅपटॉप कोठून आणणार,ऑनलार्इन फीस कोठून भरणार अशा संपुर्ण गरिबाच्या टाळूवरचे कोणी खाणार्‍यांना मात्र,खरा कोरोना झाला पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a comment

 
Top